व्यक्ती तितक्या प्रकृती
प्रवासात खिडकीला लागून जागा मिळाली तर प्रवासाचा कंटाळा बराच कमी होतो.असेच एकदा मी आणि माझी मैत्रीणबसमधून पाचेक तासांच्या प्रवासाला निघालो होतो.गप्पांची टकळी अखंड चालू होती हे अधिक सांगणे न लगे.
त्या प्रवासातला एक प्रसंग आठवला.रस्त्यालगत कुणा अज्ञात व्यक्तीचा दुर्दैवाने अपघात झाला होता.चारचाकी गाडीची धडक बसल्याने डोक्यातून रक्त येत होत.त्याना दवाखान्यात नेण्यासाठी लोकांची गडबड सुरु होती.आमची बस तिथून पुढे निघाली आणि प्रत्येकाने आपापली मत मांडायला सुरुवात केली.
एक आजोबा म्हणजे 'तरुण पोर आजकालची,न धड बघून चालतात न धड गाड्या चालवतात.'माझ्या मनात विचार आला 'म्हणजे फक्त तरुणांचेच अपघात होतात का?'
'ठोकणारा पाळून गेला असेल साला' इति कुणी काकाश्री.
भले! न पाहता,न ऐकता बेछूट आरोप!
त्यांच वाक्य तोडत एक काकू उद्गारल्या,'घरी कळाल असेल का त्या मुलाच्या?आई बापांच्या जीवाला किती काळजी!'
त्या माउलीला त्याक्षणी डोळ्यासमोर स्वत:ची मुलं दिसत असावीत!
त्यानंतर भारतातले रस्ते,पावसाळा,गाड्यांचे वेग इथ पासून वाहनांचे कायदे,जबाबदारीची जाणीव पर्यंत
अनेकविध विषयांवर चर्चा झाली.तोपर्यंत गप्प बसलेल्या मैत्रिणीला कोपराने ढोसल,म्हटलं किस दुनियामे हो?
तर madam च्या डोक्यात निराळच काहीतरी चालू होत! म्हणाली,'असे अपघात झाल्यावर ब्लड ग्रुप पाहून पुढची शोधाशोधकरण्यात खूप धावपळ होते,त्यात वेळ जातो.त्यासाठी एखाद अस software डेव्हलप करूया.....म्हणजे त्यात एका तालुक्यामधल्या ब्लड बँक,हॉस्पिटल्स आणि डोनर्स यांची पूर्ण माहिती असेल.त्यांना contact करता येईल अशी व्यवस्था असेल.'
मी अवाकच! हात जोडले.म्हटलं कुठून सुचलं तुला हे इतक्या कमी वेळात?ती छान हसली.
माझ्या लक्षात आल, एखादी समस्या पाहिल्यावर त्याच्यावर नुसती चर्चा करणे किंवा अमुक चुकतंय,
तमुक सुधारणा व्हायला हवी याची चर्चा करण्यापेक्षा त्यातून एखादी सुधारणेचा एखादा मार्ग शोधणे, निदान
आपल्या परीने तसा प्रयत्न करणे जास्त महत्वाच आहे.