Friday 10 February 2012

अस्वस्थ अवस्था..
नववीतल्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेची सुरा भोकसून हत्या केली.... ते ही चेन्नई सारख्या मोठ्या आणि शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या शहरात...
चौदा -पंधरा वर्षांचा  मुलगा ,त्याने आयुष्याची अशी किती सुख दु:ख अनुभवली होती की चक्क आपल्या मादाम वडिलांकडे आपल्या तक्रारी करतात म्हणून त्याने त्या शिक्षेकेलाच संपवायचा घाट घातला? की  त्याच्या आई वडिलांनी उत्तम  शैक्षणिक   प्रगतीच फार मोठ ओझ त्याच्या शिरावर ठेवलं होत?
माझ्या मनाला हजार शंका डाचू लागल्या.समुपदेशन आणि विद्यार्थ्यांचा सहवास या दोन गोष्टींमुळे नववी ते पदवी पर्यंतच्या मुलांशी अनेक वेळा संवाद साधता येतो.अशा वेळी पालकांच्या अपेक्षा आणि मुलांची घुसमट,मुलांचा बेजबाबदारपणा आणिपालकांच्या जीवाला घोर,उद्धट मुलांमुळे शिक्षकांना मनस्ताप असे अनेक प्रकार पहिले होते.पण या घटनेने अक्षरश: हादरल्या सारख वाटल.
या घटनेतला मुलगा विशेष कुणामध्ये मिसळायचा नाही,बिल्डींग मध्येही खेळायला बाहेर पडायचा नाही 
अस बातमीत म्हटलंय.नक्की का होताहेत अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला? आजकाल मुल इतकी त्रासलेली का आहेत?त्यांना मन मोकळ करता येत नाही का? 
 'बदलती कुटुंब व्यवस्था' हा नेहमीचा टाहो फोडण बंद करून विचार करू....आता सगळ्याच मुलांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही...आणि सध्या तरी आई वडिलानाही पुरेसा वेळ देता येतोच अस नाही.मग ही मुल कुणाशीच बोलत नाहीत का?मग काय काय साचत या मुलांच्या मनात?आज काल लहानपणापासूनच फुकाचे attitude आणि status च्या भ्रामक कल्पना डोक्यात भरवल्या जातात.
आपल्याकडे तमक्या पेक्षा इतक्या वस्तू जास्त किंवा आपल घर/गाडी त्यांच्यापेक्षा महागडी आहे म्हणून आपण जास्त तोरा मिरवायचा,त्यांच्यात मिसळायच नाही..., हे काहीतरी अजीब logic पसरत निघालंय.
बर नातेवाईक म्हणावे तर तेही सणा समारंभात तोरा मिरवायला भेटतात.मग जीवाभावाचे मित्र नसले तर काय करत असतील ही मुल?मला मधेच आठवत,'मुझे मा कि याद आती थी तब मी बाथरूम मी जाकर रोती थी, वरना seniors हसते ना.... ' लहानपणापासून होस्टेलला राहिलेली एक विद्यार्थिनी सांगत होती....
  पण खरच इतक अवघड आहे मन मोकळ करण?ज्यांच्या समोर एकही मुखवटा न घालता वागू असे मित्र मिळण? आपण जसे आहोत,ज्या चुका करतो,जितके वेड्यासारखे जोक मारू ते सगळ ऐकून घेतील असे मित्र .... भले तिसरेच सल्ले देतील पण मनापासून आपल्यासाठी विचार करतील.यश मिळेल तेव्हा jealousy वगैरे शब्दांची सावलीही न पडू देता हक्काने पार्टी मागतील....आपण कधी कधी गृहीत धरतो त्यांना... पण त्यांच्या शिवाय आयुष्य imagine करून पहा....
पार्टी कोणासोबत करणार?शॉपिंग ला कुणासोबत जाणार?उगाच misd cal देऊन पकवणार कोणाला?आणि हक्काने भांडणार/रडणार कुणासमोर?
असे मित्र मैत्रिणी  असण खरच आयुष्यातील खूप सुंदर गोष्ट आहे.
तुमच्या जवळ असे मित्र नसतील तर pls शोधा आणि असतील तर त्यांना मनापासून जपा.tk cr.

2 comments:

  1. lekh awadala... tyavar mala additional ek comment add karavi ashi vate ki ata ase kiti mula ahet ji roj khalti mitra madhe khelayla avdine jatat instead of seating in home and playing on computer or video game....

    ati technology mule apan adjust karayla visato ahot ase mala vatate... for ex. mazaya kade mobile ala ki mi mala havi ti gani aikto.. instead of speaking to a person near me...

    ReplyDelete
    Replies
    1. Its tru! we find it betr to talk wid peopl thru chat and fb instead of spendng tym wid dem.yasathi janiw purwak prayatn karan garajech ahe.khas karun lahan mulana itaranshi bolanyasathi,khelanyasathi protsahit kel pahije.

      Delete