Tuesday 27 March 2012

उद्याचे बोक्या सातबंडे


उद्याचे बोक्या सातबंडे 
 प्रभावळकरांचा 'बोक्या सातबंडे'चा संच  बऱ्याच वर्षांनी हातात पाडला.आपण मोठे झालो तरी लहानपणी रम्य वाटणाऱ्या बोक्याच्या गमती पुन्हा वाचायला तितकीच मजा येते.बोक्याचा  चुणचुणीतपणा आणि तो शेंडेफळ असल्याने त्याचे होणारे लाड,मोठ्या भावाच त्याच्यावर डाफरण,बोक्यालाही धाक वाटणारे त्याचे बाबा, प्रेमळ आई आणि 'चिन्मायानंदा' या खऱ्या नावाने  हाक मारणारी एकमेव व्यक्ती म्हणजे त्याची आजी. या सर्वांच अगदी चपखल आणि या व्यक्तिरेखा खऱ्या वाटाव्यात अस चित्रण प्रभावळकरांनी केल आहे.बोक्याच्या अनेक उचापतींपैकी एक म्हणजे तो कामवाल्या मावशींच्या मुलांबद्दल त्यांच्याच तोंडून तक्रारी ऐकतो, 'माझी पोरं उगा दरदिवशी काहीबाही मागत रहात्यात 'ही कामवाल्या मावशींची तक्रार त्याला अजिबात अनैसर्गिक वाटत नाही, उलट रास्तच वाटते'. त्या मुलानाही आपल्या प्रमाणे सुटीत मजा का करता येऊ नये?' असा भाबडा प्रश्न त्याला पडतो.पण प्रश्नच उत्तर शोधणार नाही तो बोक्या कसला?उन्हाळाच्या सुटीत बोक्या आणि त्याचे मित्र मैत्रिणी आजूबाजूच्या गरीब मुलांना,कॉलनीत येणाऱ्या सगळ्या कामवाल्या मावशींच्या मुलामुलींना एकत्र करतात.आपल्याच वयाच्या या १५-२० मुलांना बोक्या आणि त्याचा ग्रुप मिळून गाणी,गोष्टी शिकवतात.चित्र काढायला मदत करतात.नेहरू तारांगणला नेऊन आणतात. यातूनच गोष्ट पुढे फुलवत बोक्याचा सत्कार आणि या सामाजिक कार्याबद्दल परदेशातील शिष्यवृत्ती आणि त्या निमित्ताने युरोपची वारी अशी छान खुलवली आहे.
   मित्रानो,यात अशक्य अस काहीच नाही. निदान एखाद्या मुलाच्या मनात या मदतीच्या भावना येण आणि त्याने त्या दृष्टीने प्रयत्न कारण अवघड नक्कीच नाही.पण हे आजूबाजूला दिसतंय का?? उत्तरादाखल नकारार्थी  मान हलली असेल तुमची.आपल्या कॉलनीतले ,सोसायटीतले 'बोक्या' कुठे हरवलेत? '९०च्या  दशकातली मुलं निव्वळ कॉम्पुटर,मोबाईलला चिकटूनअसतात' अशी ओरड आजकाल आपण सतत करतो. अगदी फेसबुक वरून सुद्धा! पण ही मुलं आपल्या आसपास सुद्धा आहेत......जर त्यांनी लहानपणापासून घरात कामवाल्या मावशीनं 'बाई' हाक मारलेली ऐकली तर त्यांना कसा काय जिव्हाळा वाटेल त्या व्यक्तीबद्दल? हजारो रुपयांची विशिष्ट जातीची कुत्री,मांजर तोरा मिळवण्यासाठी पाळायची पण रस्त्यावरच्या प्राण्यांना काही खायला घालायचं नाही.नाहीतर पाठीत धपाटा बसतो. लहान वयातच या आणि अशा अनेक गोष्टी या मुलांच्या मनावर कोरल्या जातात.त्यामुळे काही मोजके अपवाद सोडता आताची लहान मुलं बरीच आत्मकेंद्रित दिसतात.त्यांच्यातून केवळ पैसे छापणारे पदवीधर उदयाला येणार आहेत का?आणि हे असच राहील तर उद्याचे ग्रेस,पुं.ल.,शिरीष कणेकर,सुरेश भट ........नव्हे उद्याचे बोक्या हवे असतील आपल्याला तर आपल्या पिढीची जबाबदारी काय आहे? 


Wednesday 21 March 2012

No Expectations No Demands
रणबीर आणि कतरिनाच्या एका गाजलेल्या चित्रपटात त्याचा एक dialogue होता.साधारण 'मी No Expectations No Demandsअशी मैत्री निभावेन या अर्थाचा.' घाबरू नका, मी त्या चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल काही समीक्षण वगैरे लिहित नाहीये.या   dialogue वर असा विचार आला ,खरंच अशी अपेक्षा न करणार,गृहीत न धरणारी मैत्री शक्य असते?
पटकन कोणीही हो..... म्हणू शकणार नाही.कारण 'मित्र असतातच त्रास द्यायला' हे जगन्मान्य सत्य आहे.मित्र मैत्रिणीन शिवाय एकत्र दंगा कोण करणार?अडीअडचणीला  धावून कोन येणार?'माझी assignment तू लिही' अस हक्काने कोणाला सांगणार,वेळेवर न आल्याबद्दल आपण आधी झापायच आणि पुढच्या वेळी आपणच उशिरा जायचं हे कस करणार?कडकीमध्ये उधार कोण देणार?अशी लांबलचक यादी पटापट डोळ्यासमोर येते. 
काही वेळा आपण लहान गोष्टींसाठी मित्र मैत्रिणींकडून अपेक्षा करतो(ट्रीप वरून यातना आपल्यासाठी नक्की काहीतरी आणतील ),त्यात मजाही असते.पण एखाद्या वेळी त्यांना गृहीत धरल जात आणि त्याचा सर्वांनाच त्रास होतो.आपल्या शिवाय त्यांच्या priority list वर दुसराही कुणी असू शकेल ... एखाद काम,एखादी व्यक्ती,काहीही तर ते लागत मनाला.मग अशी मैत्री शक्यच नसते?की आपण उस गोड लागला म्हणून ....या न्यायाने वागतो जवळच्या लोकांशी.....असा काहीसा विचार चालू होता.इतक्यात कॉलेजमधल्या एका junior मैत्रिणीचा फोन आला.तिला एका लेखासंबंधी काही suggestions हवे होते.त्या बद्दल बोलल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे होस्टेल ला यथेच्छ नावं ठेवली,आणि होस्टेल मधल्या मैत्री आणि unity चा उदो उदो केला,गप्पा मारल्या आणि फोने बंद केला.नंतर लक्षात आल,काही अशी नाती अजूनही आहेत आपल्या जवळ जी सतत संपर्कात नसतात.त्यांच Expectations ,Demands या शब्दांशी त्यांच काहीही नात नसत.ट्रेनच्या प्रवासात भेटलेली एखादी मैत्रीण,कॉलेजमधले Senior आणि Junior वर्गातले अनेक जण,जुन्या तात्पुरत्या म्हणून झालेल्या आणि नंतर बराच काळ टिकलेल्या ओळखी.... यांच्याशी आपण नियमित संपर्कात नसतो.कधी क्वचित मेसेज किंवा facebook वर भेट होत.आपण सहज एखादा विचार शेअर करतो,एखादा सल्ला/माहिती विचारतो....पण ती फार महत्वाची ठरते!कुणी एखादी आठवण सांगत,कुणी अचानक फोन करून,'अमक्या event च नावं सुचाव 'म्हणत..... असे फोन झाल्यावर आपणही खुश असतो की इतक्या दिवसांनी या व्यक्तीने माझी आठवण काढली.... अपेक्षा नसताना कुणी आपली आठवण काढतंय म्हटल्यावर अर्थातच आनंद जास्त होतो.आणि या आनंदात आपणही एखाद्या No Expectations No Demands गटातल्या एखाद्या मित्राला फोन लावतो.अस असाल तरीही आपण जवळच्या मित्र मैत्रिणींशी तटस्थपणाने किंवा संतपणाची भूमिका घेऊन नाही वागू शकत.त्यांच्या सोबत दिलखुलास हसण्या सोबतच त्यांच्यावर चिडण,ओरडण हे सुद्धा स्वाभाविकपणे होतच.मग यांचा समतोल कसा साधायचा?
जवळ असणाऱ्यांवर मोजका हक्क गाजवू आणि इतरांनी दूर जाऊ नये म्हणून असे संपर्कात राहू :)